नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहामधील बैठक संपली. राजकीय घडामोडी आणि ओल्या दुष्काळावर चर्चा झाली. गृहमंत्री स्वत: एक विमा कंपनी सोबत बैठक घेऊन विमा कंपनीने लिब्रल राहून शेतकऱ्याला मदत करावी आशाप्रकारचे निर्देश देतील हे देखील चर्चेत सांगितले आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत करता येईल असे आश्वसन गृहमंत्री यांनी दिले आहे. अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात लवकरच स्थिर नवे सरकार बनेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले आहे.