मुंबई, दि.१५ (पीसीबी) – राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत राजकीय गदारोळ सुरू आहे. अशा वेळी काँग्रेसने नुसती नाराजी दाखविण्यापेक्षा महाआघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे ट्विट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेत नसतील तर काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री काँग्रेसला ग्राह्य धरत निर्णय घेत असल्याची खदखद काँग्रेस नेत्यांच्या मनात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला हा सल्ला दिला आहे.
ट्वीट:
“महाराष्ट्रात तिघाडी सरकार मध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे.काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा. “