काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला आहे, त्या ठिकाणी जुनीच गिऱ्हाईके वावरतात – शिवसेना

0
477

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – सोनीया गांधी यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष केल्याने शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत ज्या नावांवर चर्चा झाली ती नावे म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर अशी अवस्था असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

कलम ३७० वरूनही शिवसेनेने काँग्रेसला धारेवर धरले. लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा पराभव होऊनही ‘आम्ही देशाचे राज्यकर्ते’ या ‘मोगली’ मानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. देशात कलम ३७० हटवल्याचे स्वागत संपूर्ण देशात स्वागत होत असताना काँग्रेस ‘३७०’ ची जळमट आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला आहे. त्या ठिकाणी जुनीच गिऱ्हाईके वावरताना दिसतात. तसेच काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी शाह जबाबदार नाही. सोनिया गांधी यांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेले सत्वही गमावले असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.