मुंबई, दि. २३ (पीसीबी) – संपूर्ण देशात भाजपला मिळालेला विजय दैदिप्यमान असाच आहे. पुढील २५ वर्षे तरी मोदींना कोणी आव्हान देऊ शकणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
मोदींसमोर कुणीच टिकले नाही. किंबहूना भाजपच्या विजयाचा वारू विरोधकांना रोखता आला नाही, असे राऊत म्हणाले.
विरोधकांचे प्रश्न लोकांना रूचले नाहीत. त्यांना फक्त विकास महत्वाचा आहे. आणि त्यातूनच त्यांनी भाजपसहित एनडीएला कौल दिला. त्यांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. पक्षप्रमुखांच्या प्रचाराचे हे यश आहे, असेही राऊत म्हणाले.