‘५० बायका आणि १०५० मुलं असणं मुस्लिमांची पशू प्रवृत्ती’- सुरेंद्र सिंह

0
377

लखनऊ, दि. १५ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्या मुस्लिमांना अनेक बायका असतात तसेच मोठ्या प्रमाणात मुले असतात त्यांची वृत्ती प्राण्यांची असते असे धक्कादायक वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“मुस्लिम धर्मात लोक ५० बायका ठेवतात तसेच १०५० मुलांना जन्माला घालतात. ही कोणतीही परंपरा नसून पशू प्रवृत्ती आहे. समाजात दोन ते चार मुलांना जन्म देणे सामान्य समजले जाते”, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली असून चर्चेत आले आहेत.

गतवर्षी जुलै महिन्यात त्यांनी हिंदुत्व टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येक हिंदू दांपत्याला किमान पाच मुले असली पाहिजेत असे म्हटले होते. देशात हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. “प्रत्येक अध्यात्मिक गुरुची इच्छा आहे की, प्रत्येक दांपत्याला किमान पाच मुले असली पाहिजेत. अशाने लोकसंख्या नियंत्रित राहिल आणि हिंदुत्वही टिकेल”, असे त्यांनी सांगितले होते.