काँग्रेच्या इंजिनामध्ये बिघाड, गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही’- सुधीर मुनगंटीवार

0
376

मुंबई, दि, १५ (पीसीबी) – कॉंग्रेसने राज्यात बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष तर इतर ५ जणांची कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. याविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘काँग्रेसचे इंजिन खराब झाले आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही’अशा शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी ते स्वप्न काही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते असंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. लोकसभेतील पराभवाची जबादारी घेत काँग्रेसध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, तर काही पदाधिकाऱ्यांने सुद्धा राजीनामे देऊ विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात काही बदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून कॉंग्रेसने राज्यातील संघटनेत मोठे बदल केले आहेत. या बदलांवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे.