सोनियांनी इटलीहून येऊन भारताचं नागरिकत्व घेतलं, आता इतरांनाही ते घेऊ द्या – अनिल विज

0
426

चंदीगड,दि.२७(पीसीबी) – देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे.काँग्रेससह इतर पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी स्वत: इटलीहून भारतात आल्या, आता ज्यांना भारताचं नागरिकत्व घेण्याची इच्छा आहे त्यांना भारताचं नागरिकत्व घेऊ द्या. विनाकारण इतरांना नागरिकत्व देण्यावर प्रश्न उपस्थित करु नका, असं विज म्हणाले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

देशात अशांतता पसरवण्यासाठी सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युनियन तयार केली आहे. या माध्यमातून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या युनियनचे सदस्य आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.