सिंधूदूर्ग जिल्ह्यातील विधानसभेचे तीनही उमेदवार मीच ठरवणार – नारायण राणे  

0
677

कणकवली, दि. १२ (पीसीबी)  –  आगामी विधानसभा निवडणूक  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही जागांवरील उमेदवार मीच जाहीर करणार आहे, तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिले.  

ओसरगाव महिला भवन येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका सांगितली. या बैठकीला आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,  सतीश सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत माझ्या नावाची चर्चा  सुरू आहे.  मात्र, मी निवडणूक लढवणार नाही, असे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी सांगितले.