परळी, दि. २४ (पीसीबी) – काही दिवसांवर विधानसभा निवडणुक असल्याने सर्वच पक्ष मोर्चे बाधणीला लागले आहे. शिवस्वराज्य यात्रे दरम्यान परळी येथील आयोजित सभेत संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, कर्ज माफी जर नाही केली, तर पवारांची औलाद सांगायचो नाही.
राज्यात आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ. आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ , यावेळी अजित पवार म्हणाले .