पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – गरीब सवर्णांना आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. परंतु, आतापर्यंत कोणत्याही सरकारला हे आरक्षण देता आले नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारने गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी पूर्ण केली आहे. सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. ८) दिली.