सगळ्या मोदी भक्तांनी सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल – नवाब मलिक

0
395

मुंबई,दि.३(पीसीबी) – ‘सगळ्या मोदी भक्तांनी जर सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून रविवारी याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयावर नवाब मलिक यांनी टोलेबाजी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सोशल मीडिया वापरणार नाही, अशी भूमिका अनेक मोदी प्रेमींनी घेतली आहे. यावर बोलताना ‘सगळ्या मोदी भक्तांनी जर सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल’, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, मोदीजी जर सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा निर्णय देशहिताचा आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करू, अशी कोपरखळीही मलिकांनी लगावली आहे.