संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊतांकडेच आहे – उद्धव ठाकरे

0
287
मुंबई, दि.३ (पीसीबी) – अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये झालेल्या बदलावर भाष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असे बोलले जात आहे. पण, सामनाची भाषा आहे तशीच राहिल. सामनाची भाषा ही पितृभाषा आहे. बाळासाहेबांकडून आलेली आहे. त्यामुळे सामनाची भाषा आणि दिशा कधीच बदलणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.