सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली त्यामुळे भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही – उद्धव ठाकरे

0
496

मुंबई,दि.३(पीसीबी) – सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली, भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते.

शिवसेना पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडेच आहे. ‘सामना’तील भाषा ही बाळासाहेबांकडून आलेली आहे. त्यामुळे ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नसल्याचं यांनी म्हटलं आहे.

संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असे बोलले जात आहे. पण, सामनाची भाषा आहे तशीच राहिल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणावरुन आदळआपट करु नका, मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.