मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार नीलेश राणे यांचे पुतळे जाळले होते. यावर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना ‘औकातीत राहा’, असा इशाराच दिला आहे.
मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखे काही शिवसैनिकानी माझे दोन तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा, अशा शब्दांत ट्विट करून राणे यांनी शिवसैनिकांना इशारा दिला.
नीलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी काही ठिकाणी नीलेश राणे यांचे पुतळे जाळले या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांवर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. हे प्रकरण कसे दाबले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.