शिवसेना का सोडली; नारायण राणे लवकरच करणार गौप्यस्फोट

0
734

मुंबई, दि. ४ (पीसीबी) –  माझे  आत्मचरित्र लिहून तयार झाले आहे. त्याचे प्रकाश लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.  शिवसेना सोडण्यामागचे खरे कारण आपल्या आत्मचरित्रातून समोर येईलच,  असे खासदार  नारायण राणे यांनी म्हटले आहे.  एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  राणे बोलत होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक काहीही मतभेद नाहीत. त्यांच्याशी असलेले मतभेद वैचारिक आहेत. उद्धव ठाकरे यांनी लोकांना कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्याचबरोबर  माझ्या आत्मचरित्रात मी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप  या पक्षांमधील राजकीय प्रवासाबाबत लिहिले आहे,  असेही राणे यांनी  सांगितले.

दरम्यान, राणे यांचे पुत्र आमदार  नितेश राणे यांनी २४ एप्रिल रोजी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये नारायण राणे आत्मचरित्र लिहित आहेत,  असे त्यांनी  म्हटले होते.  अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा असेही त्यांनी म्हटले होते.   त्यामुळे या आत्मचरित्रात नेमका कोणता उल्लेख असणार, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.