“विरोधी पक्षाने बिनधास्त टीका करावी पण…”

0
225

मुंबई,दि.२८(पीसीबी) – “महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही टीका करुन आपल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. “विरोधी पक्षाने बिनधास्त टीका करावी, टीकेसाठी खोटेपणा करु नये,” असा सल्लाही राऊतांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला.

विरोधी पक्षाने टीका करावी, पण टीकेसाठी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये. मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे का जाणार नाहीत, याची संपूर्ण माहिती त्यांनी पीएमओ कार्यालयातून घ्यावी. पंतप्रधान मोदींनी केलेल्या ज्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन सरकार करत आहे. मात्र या सूचना भाजप कार्यकर्त्यांना माहिती नसतील, तर तुमची यंत्रणा बदलावी लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पूर्ण पाहिली. फार चांगल्या मूडमध्ये होते. त्यांना आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची संपूर्ण मुलाखत पाहिली, ऐकली आणि वाचली हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठत आहेत. आपापल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही टीका करुन आपल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली, असेही संजय राऊत म्हणाले.