विद्यार्थीनींना जर वाटत शपथ घेतल्याने संरक्षण होत असेल तर त्यांनी शपथ घेतली असावी – यशोमती ठाकूर

0
367

अमरावती, दि.१५ (पीसीबी) – महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीच या विद्यार्थीनीना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी समर्थन केले आहे. याबाबत त्या अमरावती येथे माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शपथेच्या माध्यमातून विद्यार्थीनींनी जनजागृतीचीचा प्रयत्न करत होत्या आणि कोणी काय शपथ घ्यावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे असे विधान यशोमती ठाकूर यांनी केले,’ असे ते म्हणाले. ‘विद्यार्थीनींना जर वाटत असेल की शपथ घेतल्याने संरक्षण होत असेल तर त्यांनी शपथ घेतली असावी, असेही महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.तसेच भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया आली आहे.