वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली – वसिम रिझवी

0
384

नवी दिल्ली,दि.२७(पीसीबी) – ईशान्य दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी केला आहे. तसेच वारिस पठाण यांच्या आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी आहोत या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटत आहेत, असंही रिझवी म्हणाले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन राजधानी पेटली आहे. सीएएवरुन सुरु झालेल्या दंगलीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर वसिम रिझवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. सरकार, सीएए आणि देश आपलाच आहे. आपसात भांडू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे. काँग्रेसच्या विषाचा प्याला पिऊ नये. काँग्रेसच्या जाळ्यात अडकू नका, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, शाहीनबामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनावरही रिझवी यांनी टीका केली आहे. शाहीनबागमधील महिलांच्या अडाणीपणामुळे दिल्लीत हिंसा घडून येत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.