लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी, २०१४ सारखे यश मिळणे अशक्य; भाजपाचे अंतर्गत सर्वेक्षण

0
1637

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी राज्यात २०१४ मधील निवडणुकीसारखे यश मिळणार नाही, असा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणआथ वर्तवण्यात आला आहे. शिवसेना-भाजपा युती झाली तर आगामी निवडणुकीत युतीला ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, पोटनिवडणुकांनंतर ४८ पैकी २२ जागा भाजपाकडे आहेत. तर शिवसेना १८, राष्ट्रावादी काँग्रेस ५, काँग्रेस २ आणि स्वाभिमान पक्षाकडे एक जागा आहे.

निवडणुकीपूर्वी भाजपाने अंतर्गत सर्वेक्षण केले असून यामध्ये जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती केली तरी दोन्ही पक्षांना मिळून ३० ते ३४ जागा मिळतील. भाजपाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली तर १५ ते १८ जागाच मिळतील. तर शिवसेनेला पाच ते आठ जागा मिळतील, असा अंदाज यात वर्तवण्यात आला. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला २२ ते २८ जागा मिळतील. असे या सर्वेक्षणात म्हटल्याचे एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या अहवालात शिवसेनेशी युती करण्यावर भर देण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर भाजपाच्या एका माजी मंत्र्याने नाव न छापण्याच्या सांगितले की, शिवसेनेची युतीसाठी एक प्रमुख अट आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे असून जागांच्या आधारे मुख्यमंत्रीपद देण्यास शिवसेना अनुकूल नाही. शिवसेनेला कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात भाजपाने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असे वाटते. कर्नाटकमध्ये काँग्रेसने जास्त जागांवर विजय मिळवूनही मुख्यमंत्रीपद जनता दल सेक्युलर या पक्षाला मुख्यमंत्रीपद दिले. तशीच पद्धत महाराष्ट्रात राबवण्याची मागणी शिवसेनेने केल्याचे सूत्रांनी सांगितले.