औरंगाबाद, दि. ३ (पीसीबी) – औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या लग्नाविषयी भाष्य केले. सगळे प्रश्न सुटले की, माझ्या लग्नाचे बघू, असे उत्तर देऊन आदित्य यांनी या विषयावरून चर्चा दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला.
आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात तरुणांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमात आदित्य यांना लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य यांनी सगळे प्रश्न सुटले की माझ्या लग्नाचे नंतर बघू, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना तरुणांशी मोकळेपणाने संवाद साधता यावा, यासाठी रॅम्प उभारण्यात आला होता. चकाचक स्टेज, रँम्प वॉक पोडीयम, तरूणांना बसण्यासाठी खास गॅलरी, रॉक बँड, तरूणांची गर्दी, लाईट्स, अर्ज भरून घेताना शिस्तबद्ध तरूणाई असे कॉर्पोरेट चित्र दिसत होते.