राम मंदिराला काँग्रेसमुळेच विलंब; पंतप्रधान मोदींचा आरोप

0
382

जयपूर, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराला काँग्रेसमुळेच विलंब होत आहे. मंदिरप्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेस अडथळे निर्माण करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज (रविवार) केला. काँग्रेसच्या नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रकरणाची सुनावणी टाळण्यास सांगितले, असे मोदी यावेळी म्हणाले.