राज्यात आश्चर्यकारक निकाल लागतील – शरद पवार 

0
544

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक  लागेल. लोकांचा प्रतिसाद पाहता, हे  शक्य आहे,  असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना  व्यक्त केला आहे.   

शरद पवार म्हणाले की,  गेले काही वर्षात माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या, सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झाली. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्यांपैकी काही ५-१० नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करुन घेतला. एखादी व्यक्ती ४-५ आमदारांना निवडून आणणार असतील, तर त्याला किंमत दिली जाते.  नंतर हळूहळू त्यांना बाजूला केले जाते

तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असे काही नव्हते. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता, आज स्थिती तशी नाही, येतंय त्याला घ्या,  अशी स्थिती आहे. जे येत नसतील त्यांना सत्तेचा गैरवापर करुन पक्षात घेतले जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.