हुबळी, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील ‘यूपीए’च्या १० वर्षाच्या काळात १२ एअर स्ट्राइक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिले आहे.
हावेरीमध्ये पक्षाच्या रॅलीला संबोधित केल्यानंतर हुबळी विमानतळावर खरगे पत्रकारांशी बोलत होते.
राजनाथ सिंह यांनी तीन एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला आहे. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा १२ एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारकडून शहिदांच्या मृतदेहांचे राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
गेल्या ५ वर्षात तीन वेळा सीमेच्या पलिकडे जावून भारतीय जवानांनी एअर स्ट्राइक केला आहे. दोन स्ट्राइकची माहिती मी देईन. परंतु, तिसऱ्या स्ट्राइकबद्दल काहीही सांगणार नाही, असे राजनाथ यांनी म्हटले होते.