या लोकांची लायकी नाही; पंकजा मुंडेंचींची अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर जोरदार फटकेबाजी

0
417

बीड, दि. ३० (पीसीबी) – अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापत चालले आहे. यामध्ये आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उडी घेतली असून परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

आम्ही दुष्काळमुक्त मराठवाडा करणारे आहोत, धरणात लघुशंका करण्याची भाषा बोलणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहेत. जे परळीचा नाला स्वच्छ करू शकले नाहीत… ते लोक धरणाची काम करणार का? या लोकांची लायकी नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे. बारामतीतील नेते येऊन माझ्यावर आरोप करतात पंकजा मुंडेंना परळीच ज्योतिर्लिंग वाचवता आल का? तुमच तुम्ही पाहा ना? आधी तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर बसतील हे सांगता येत नाही, लागले टीका करायला’ अशा शब्दात पंकजांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.

लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्याची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत, लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडता आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात, असे म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंवर देखील टीकास्त्र सोडले.