मुंबई,दि.१९(पीसीबी) – अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संभाषणात अनेक धक्कादायक तपशील असून २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबतही अत्यंत संवेदनशील असे संभाषण यात आहे. यावरुन गेले काही दिवस मोठं वादळ उठलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे.
‘लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता य कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे,’ असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021
दरम्यान ‘फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, यही पुछता है भारत,’ असंही पवारांनी म्हटलं आहे.
फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, 'यही पुछता है भारत!'
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021