…म्हणून खान आडनाव बदलले

0
292

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – जगप्रसिद्ध सरोद वादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांनी मुंबईत ‘मॉर्निंग राग’ या विशेष सरोद मैफलीचे आयोजन केले होते. मुंबईतील प्रसिद्ध रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये हा कॉन्सर्ट झाला. यावेळी उस्ताद अमजद अली खान यांनी आपल्या सरोद वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रसिद्ध कवी आणि चित्रपट निर्माते गुलजारही उपस्थित होते. गुलजार यांनी अमजद अली खान यांच्यासाठी एक डॉक्युमेंटरी फिल्मही बनवली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत खान आडनावामुळे येणाऱ्या अनेक अडचणींविषयी उस्ताद अमजद अली खान यांनी वक्तव्यं केले आहे.

उस्ताद अमजद यांनी नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली आहे. उस्ताद अमजद अली खान यांना त्यांच्या मुस्लिम आडनावामुळे त्यांना ब्रिटनचा व्हिसा नकारण्यात आला. यानंतर आपली निराशा व्यक्त करत त्यांनी आपले नाव बदलून सरोद ठेवायचे सांगत म्हणाले, “२१ व्या शतकात सर्व काही शांतपणे आणि सुरळीत होईल, असे वाटत होते. शिक्षणाने माणसे हुशार होतील असे वाटतं होते. पण शाळा हा धंदा बनला आहे. कदाचित त्यामुळेच शिक्षण आपल्याला प्रेमाने वागणं शिकवू शकले नाही. आजही धर्म आणि रंगाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. जगातील लोक शिक्षणामुळे प्रेमळ होण्याऐवजी अधिक निर्दयी झालेत.”

जगभरात मुस्लिमांसोबत होणाऱ्या भेदभावावर उस्ताद अमजद अली खान यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११च्या हल्ल्यानंतर मुस्लिमांबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर मिस्टर खान म्हणून परदेशात गेल्यावर माझी कसून तपासणी केली जायची. म्हणूनच जेव्हा माझ्या पत्नीने अमन आणि अयान या मुलांना जन्म दिला तेव्हा आमच्या पूर्वजांचे आडनाव म्हणजेच बंगश हे आडनाव आम्ही त्यांना दिले. आता जगभरातून कोणीही खान अमेरिकेत किंवा इतर कोठेही गेले, तर त्यांची अधिक तपासणी केली जाते. आमच्या बाबतीत असे काही फारसे घडले नसले तरी तेथील लोकांच्या मन:शांतीसाठी आम्ही सूटबूट घालतो.”