मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही – राज ठाकरे

0
392

मुंबई,दि.९(पीसीबी) – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन निघालेल्या मोर्चावर टीका केली आहे. मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही, असं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

मोर्चाला उत्तर मी मोर्चानेच दिलं आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना बाहेर हाकला ही आमची मागणी आहे. ज्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान नाही असे लोकही या कायद्याबाबत बोलताना दिसतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.

भारत हा काही धर्मशाळा नाही. कोणीही यावं आणि इथे रहावं. घुसखोरांना बाहेर हाकलंच पाहिजे. घुसखोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.