केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त ४८ तास द्या, मग बघा…

0
406

मुंबई,दि.९(पीसीबी) – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “राज्य सरकारला सांगून काही उपयोग नाही, केंद्र सरकारला सांगणार आहे पोलिसांना हात सोडून ४८ तास द्या, मग बघा गुन्हेगारी कशी शुन्यावर येते. सर्व घुसखोरांना पोलीस हाकलावून लावतील” असं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.

देशातील घुसखोराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घुसखोरांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. भारत हा काही धर्मशाळा नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलं पाहिजे. त्यामुळे पोलिसांना हात सोडून मोकळीक द्या, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्यांनी मोर्चे काढले त्यांना मोरच्याने उत्तर..आजच सांगतो यापुढे दगडाला दगडाने उत्तर ,तलवारीला तलवारीने उत्तर..एकोप्याने रहा,ज्या देशाने दिलं त्याला बरबाद का करतो..जो देशप्रेमी मुस्लिम आहे त्याने जागृत राहिले पाहीजे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.