मी केलेल्या वक्तव्याचा अनर्थ माध्यमांनी केला, मी ‘तसं’ म्हणालोच नाही – सुधीर मुनगंटीवार

0
624

मुंबई,दि.१३(पीसीबी) – मी केलेल्या वक्तव्याचा अनर्थ माध्यमांनी केला. मी तसं म्हणालोच नाही, असं म्हणत आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटी मारली आहे.

होय, आम्ही शिवसेनेला फसवलं, अशी उघड उघड कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भर विधानसभेत दिली होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी आता पलटी मारली आहे. मी तसं म्हणालोच नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मी केलेल्या वक्तव्याचा अनर्थ माध्यमांनी केला. मी तसं म्हणालोच नाही. तसेच भाजप कोणत्या पक्षाला फसवण्यासाठी काम करत नाही. राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या पक्षांपैकी एक भाजप आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नोव्हेंबर महिन्यात घटस्फोट झाला. मुख्यमंत्रिपदासाठी २५ वर्षांचा संसार त्यांनी आटोपता घेतला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संधान साधत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दोन्ही काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्रिपदी बसवलं. भाजपला असं होईल हे अजिबातही अपेक्षित नव्हतं, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.