‘मीठ जास्त खाऊ नका, अन्यथा….’

0
340

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मीठाचा अधिक वापर केल्याने हृदय विकाराचा रोग होतो. यामुळे लोकांमध्ये हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा अधिक धोका असल्याचे आता पुढे येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्लूएचओ) बुधवारी अन्नातील मीठ अर्थात सोडियमचे प्रमाण मर्यादित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

जास्त प्रमाणात मीठ खण्यामुळे इतक्या लोकांचा मृत्यू
एका अहवालात असे म्हटले आहे की जागतिक स्तरावर, दरवर्षी 11 लाख लोकांचा मृत्यू चांगला आहार नसल्याने आणि कमी आहारामुळे होत आहेत. यापैकी 3 लाख अशी प्रकरणे आहेत जे आपल्या आहारात अधिक मीठाचा वापर करत आहेत. सोडियमचे सेवन अधिक केल्याने मृत्यूला कारण ठरत आहे. खाद्यपदार्थांमध्ये अधिक सोडियम वापरतात.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, बर्‍याच श्रीमंत देशांमध्ये आणि बर्‍याच कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लोक ब्रेड, अन्नधान्य, प्रक्रिया केलेले मांस आणि चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियममध्ये वापरले जात असते.

सोडियम क्लोराईड हे मीठाचे रासायनिक नाव आहे आणि सोडियम हे एक खनिज आहे, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. सोडियमच्या सेवनाबाबत डब्ल्यूएचओचे संचालक-जनरल टेड्रोस एडनॉम घेबेरियसस म्हणाले, “मीठाचे सेवन कमी करण्यासाठी आणि लोकांना योग्य खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणे तयार केली पाहिजेत.”

टेड्रोस पुढे म्हणाले, “अन्न आणि पेय उद्योगांना प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामधील सोडियमची पातळी कमी करावी लागेल. खाण्यापिण्यासाठी 64 वस्तूंबाबत WHO नवीन बेंचमार्क तयार केला आहे. याद्वारे 194 सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांना जागरूक केले जाईल, जेणेकरून ते अन्न आणि पेय पदार्थ बनविणार्‍या कंपन्यांचे निरीक्षण करू शकतील.