मास्क न घालता फिरताय ? सावधान, आता होणार कडक कारवाई

0
401

मुंबई,दि.२८(पीसीबी) – मुंबईत मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. मात्र आता मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 रुपये करण्यात आला आहे.यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेच्या वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत.

शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या 20 एप्रिल ते 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 234 मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसून करण्यात आला आहे.