महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे; मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत – राहुल गांधी

0
282

नवी दिल्ली,दि.२६(पीसीबी) – महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दाटीवाटीच्या परिसरत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. दिल्ली, मुंबई, पुणे या भागात दाटीवाटीची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळायला हवी, असं मत राहुल गांधी यांनी मांडलं.