संगमनेर,दि.८(पीसीबी) – राज्याच्या आणि देशाच्या हिताचं राजकारण भाजपचे नाही. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवणं ही काळाची गरज होती. भाजपपेक्षा मराठी बाणा दाखवणारी शिवसेना लाख पटीने चांगली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते संगमनेरमध्ये बोलत होते.
तालुक्यातील जनतेचे अलोट प्रेम आणि पाठिंब्याच्या जीवावर मी सलग आठव्यांदा विधानसभेत पोहोचलो. परंतु यापूर्वी कधीही पाहिला नव्हता असा काळ निकालानंतरच्या महिनाभरात अनुभवला, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दाखवलेला मराठी बाणा आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.