मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

0
319

नांदेड, दि. २५ (पीसीबी) : ओबीसीच्या अरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे., असं मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत असतील, तर ते चुकीचं आहे, असंही बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

अशोक चव्हाण यांनी बोलताना सांगितलं की, “मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाची भूमिका आम्ही याआधीच स्पष्ट केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, कोणत्याही त्यामध्ये बदल न करता, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, हिच सरकारची भूमिका आहे. यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम विरोधक करत असतील, तर ते चुकीचं आहे. सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. आजही तिच भूमिका आहे. महाविकास आघाडीतही यासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत.”

अशोक चव्हाण बाभळी बंधाऱ्याच्या पाणी विसर्गाविषयी बोलताना म्हणाले की, “बाभळी बंधाऱ्यांच्या पाणी विसर्गाविषयी सर्वोच्च न्यायालयानं मागे निर्णय दिला होता की, 28 तारखेपर्यंत बंधाऱ्याचे गेट खुले ठेवण्यात यावे. बंधाऱ्याचे गेट उघडे असल्यामुळे महाराष्ट्राचं पाणी तेलंगणात वाहून जात आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला पण, बाभळी बंधाऱ्याचा गेट उघडा असल्यामुळे पुराचं पाणी समुद्रात वाहून गेल, त्यामळे तेलंगणानं पूर कमी झाल्यानं पोचमपाट धरणात पाणी अडवावं. या विषयावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं बोलणं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालं, पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही.”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या विषयावर महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असावी. या विषयावर पाटील यांनी महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते, आमदार यांचे मत जाणून घेतलं आहे. आता निर्णय पक्षाध्यक्षांनी घ्यायचा आहे.”