सिंधुदुर्ग, दि. ६ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. याचे खरे श्रेय त्यांचेच असून त्यांच्यामुळेच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी राणें यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे महाराणा प्रताप कलादालनाच्या उद्घाटनप्रसंगी संभाजीराजे बोलत होते.
याआधी आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यानंतर सर्व मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम आम्ही केले. त्यावेळी आम्ही सर्वांनी लढा दिला. त्यानंतर मराठा आरक्षणाची जबाबदारी द्यायची कोणाकडे हा प्रश्न उभा राहिला होता. त्यावेळी एकच कणखर माणूस आणि धाडसी निर्णय घेणारा माणूस म्हणून नारायण राणे यांच्याकडे ही जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आम्हा सर्वांनी दिली.
राणे यांच्याकडे जबाबदारी दिल्याने आपल्या अंगाला काही लागायला नको. धाडसी निर्णय घेणार माणूस म्हणजे नारायण राणे आहेत. आज १६टक्के आरक्षण मिळाल आहे ते हेच आहे. खरे धाडस केले आहे ते नारायण राणे यांनीच, असे खासदार संभाजीराजे यावेळी म्हणाले.