पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल, तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्या. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहाच महिने बाकी आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपला संताप आज (रविवार) येथे व्यक्त केला.
तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचे आश्वासन आता पूर्ण करा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह केला आहे, असे आठवले यांनी आज येथे सांगितले. पिंपरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
लोकसभा निवडणुकांसाठी महायुती झाल्यास आरपीआयला दोन आणि शिवसेना युतीत नसेल, तर चार जागा द्याव्यात. तसेच लोकसंख्या वाढल्याने अडीच टक्के दलित समाजाचे तसेच ओबीसीचे दहा टक्के आरक्षण वाढवावे, अशी मागणी करणार आहे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.