भाजप स्वबळावर लढल्यास १६० जागांवर विजय मिळेल – गिरीश महाजन

0
613

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. सत्ता कायम राखण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे.  भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की,  भाजपला स्वबळावर लढल्यास १६० जागांवर विजय मिळेल, मात्र, तरीही महायुतीकरून आम्ही निवडणूक लढवण्यास आमचे प्राधान्य  असेल.  भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती निश्चित होणार असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी जागावाटप आणि इतर बोलणी झाली होती. ज्या जागांबाबत शंका आहे, त्याची चर्चाही ठरल्यानुसार  करण्यात येणार आहे, असेही  महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपने  केलेल्या सर्व्हेनुसार  महायुतीला २२९ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या सर्व्हेमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. तसेच या सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युती करूनच निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचे  म्हटले आहे.