भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणतं? – रावसाहेब दानवे

0
411

औरंगाबाद, दि.८ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर युतीची सत्ता आली तर भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारला असता भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणतं? असा प्रतिप्रश्न करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुगली टाकली आहे.

शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सूप्त वाद आहे हे आता महाराष्ट्राला समजलं आहे. भाजपाच्या सदस्य नोंदणी उद्घाटन कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे रविवारी औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता होणार नाही असे कोण म्हणते? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसंच युतीला २२० जागा मिळतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरातील पायाभूत सोयी सुविधांसाठी राज्याने १६०० कोटींची तरतूद जाहीर केली आहे असंही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. औरंगाबाद शहरातला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.