पुणे, दि. १२ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्याचे नाव जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले आहे. त्यामुळे त्यांचेच नाव या शहराला देण्यात यावे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.