मुंबई, दि.३ (पीसीबी) – ‘कोकणात पक्ष बदलून चालत नाही. पण परिस्थितीनुसार मला कधी पक्ष, तर कधी चिन्ह बदलावे लागले.’ असे मत शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात आ.जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. राजकारणात माझ्याइतका भाग्यवान माणूस कोणी नाही, असेही ते यावेळी म्हणाले.