पंतप्रधान इम्रान खानला लाल रंग पसंत पडला असेल; कुमार विश्वास यांचा टोला

0
404

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – शांततेचा पांढरा रंग तर तुम्हाला समजत नाही. आता  पंतप्रधान इम्रान खान यांना लाल रंग पसंत पडला  असेल, अशी आशा आहे. जितके मागाल तितके टोमॅटो पाठवू, वचन आहे,  अशी टीका प्रख्यात कवी आणि  आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी  पाकिस्तानवर  केली आहे.

कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक  केले आहे. तसेच पाकिस्तानवर निशाणा साधताना पुरावे मागणाऱ्यांच्या हातात काही ग्रॅम बॉम्ब ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे.  त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही  तोफ डागली आहे.

भारताने पाकिस्तानला टोमॅटो पाठवण्यावर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या विधानाच्या बहाण्याने इम्रान खान यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून बालाकोटवाले भारतीय टोमॅटोसाठी रडत होते. भारतीय वायूसेनेने त्यांना एका रात्रीत हजार टनांची पहिली खेप जैश ए मोहम्मदच्या कंट्रोल रूमला पाठवली आहे.