“निवडणूक ‘ईव्हीएम’वर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या नाही तर हात वर करून घ्या, पुन्हा भाजपचीच सत्ता येणार”

0
434

सातारा, दि. ३ (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच राहिलेले नाहीत, त्यामुळे निवडणूक ‘ईव्हीएम’वर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या किंवा हात वरून करून घ्या, पुन्हा भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. उंब्रज येथील भाजप विजय संकल्प बुथ मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरे न्यासाचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर तसेच उपाध्यक्ष मनोज घोरपडे उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, यापूर्वी आपण ‘अब की बार २२८ पार’ असे म्हणत होतो, परंतु आता तर ‘२८८पार’ असे म्हणण्यासारखे महाराष्ट्रातील राजकीय चित्र आहे. विरोधक पोर पळवण्याचा आरोप आमच्यावर करतात, पण उदयनराजे, शिवेंद्रराजे पोर आहेत का? अशी मिश्कील टिपणी पाटील यांनी केली. बांधावर बसून पाहणारे आता भाजपात उडय़ा घेऊ लागले असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान या मेळाव्यात सरकार कम्पसचे चंदन शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.