कलंकितांच्या प्रवेशामुळे भाजपला बदनामीचा धोका – अण्णा हजारे

0
405

अहमदनगर, दि.३ (पीसीबी) – गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजपने प्रवेश देणे योग्य नाही. कलंकितांच्या प्रवेशामुळे या पक्षाला बदनामीचा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांतील अनेक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पक्षांतराबाबत भाष्य केले आहे.

राजकारणात भ्रष्ट नेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे नेते आपल्या भ्रष्टाचार आणि गुन्ह्य़ांवर पांघरूण घालण्यासाठी नेहमीच सत्तेच्या वळचणीला जातात. कलंकितांना पक्षप्रवेश देण्याचे सत्र असेच कायम राहिले तर पक्ष बदनाम होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा हजारे यांनी भाजपला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे. भ्रष्ट, गुन्हेगार व्यक्तींना पक्षात प्रवेश देणे मुख्यमंत्र्यांना कदाचित रुचत नसावे. मात्र केंद्रीय पातळीवरून निर्णय होत असेल तर त्यांचाही नाइलाज होत असावा, असे मत हजारे यांनी यावेळी व्यक्त केले.