“नागपूर जिंकता आले नाही आणि बारामतीच्या गोष्टी करता;” फडणवीस झाले ट्रोल

0
411

नागपूर, दि.९ (पीसीबी) – राज्यातील सत्ताबदलानंतर झालेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाची पीछेहाट झाली आहे. नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदांवरील सत्ता भाजपाला गमावावी लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल भाजपासाठी धक्का मानला जात आहे. या निकालांनंतर महाराष्ट्र काँग्रेसने ‘पंचायत समिती निकालांमध्ये सुद्धा भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे,’ अशी पोस्ट आकडेवारीसहीत फेसबुकवर केली आहे. ही पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनाही शेअर केली. मात्र आता यावरुन अनेकांनी फडणवीस यांना ट्रोल केले आहे.

पंचायत समिती निकालांमध्ये सुद्धा भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. एकूण जागा: 664 भाजपा: 194 काँग्रेस: 145 राष्ट्रवादी काँग्रेस: 80 शिवसेना: 117 अन्य: 128

Gepostet von BJP Maharashtra am Mittwoch, 8. Januar 2020