नरेंद्र मोदींची भीतीने झोप उडाली आहे – राहुल गांधी

0
823

नवी दिल्ली, दि.२ (पीसीबी) – राफेल खरेदी करारावरून मोदी सरकारला घेरणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. जसॉल्ट कंपनी ही मोदींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी झाली तर मोदी त्यात अडकतील. आपण पकडले जाऊ याच भीतीने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

राहुल गांधींनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. डसॉल्टने अनिल अंबानींच्या कंपनीला २८४ कोटी रुपये दिले. या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केली. अंबानींकडे जमीन होती. त्यामुळेच त्यांच्या कंपनीला काम मिळाले, असे आता डसॉल्टचे सीईओ सांगत आहेत, असे राहुल म्हणाले. कोणतेही काम न करणाऱ्या आणि तोट्यात असलेल्या कंपनीत डसॉल्टने गुंतवणूक का केली, असा प्रश्न उपस्थित करत घोटाळ्याचा हा पहिला हप्ता होता, असा आरोप केला.