नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणे, ही ‘आणीबाणी’ – उध्दव ठाकरे   

0
386

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ज्येष्ठ साहित्यिका  नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पाठवलेले निमंत्रण रद्द करणे ही ‘यवतमाळची आणीबाणी’  आहे, अशी  टीका शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’  च्या अग्रलेखातून  संमेलनाचे आयोजक आणि साहित्यिकांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी  रोखठोक  भाष्य केले.