दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने पावले उचलावीत; राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
687

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने पावले उचलावी, यासाठी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील भीषण दुष्काळी प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर काम सुरु करावे आणि दुष्काळी भागातही काम सुरु करावे. यावेळी राष्ट्रवादीचे नते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आमच्या शिष्टमंडळाने दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्याची सरकारने नुकसान भरपाई अद्याप दिलेली नही. सरकारने त्याचे पैसे लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली