सातारा, दि. ८ (पीसीबी) – दहावी परीक्षेचा आज (शनिवार) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अपयशी झालेल्या विध्यार्थ्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी कानमंत्र दिला आहे. १० वीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने परीक्षेची तयारी करून यश संपादन करावे, असा सल्ला उदयनराजे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांनी १० वीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. १० वी मधील सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या आई वडिलांचे व शिक्षकांचे स्वप्न साकार करा. अशा शुभेच्छा उदयनराजे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, उद्यनराजे आपल्या हटके स्वभावासाठी परिचित आहेत. कोणत्याही घटनेवर ते आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देतात. दहावीच्या निकालानंतर त्यांनी अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने परीक्षेची तयारी करून यश संपादन करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.