“त्या” बोलीवरच दिल्लीश्वरांनी मिंधे महाशयांना मुख्यमंत्री केले, दै. सामनातून भाजपवर टीकास्त्र

0
221

मुंबई,दि.०२(पीसीबी) – गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी श्री. मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते. आज जे जे काही नवे घडविले जात आहे ते सर्व फक्त गुजरातलाच नेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मता व विकासाच्या समतोलास बाधा आणणारे आहे. संरक्षण खात्याचे प्रकल्प असोत पिंवा इतर उद्योग, प्रत्येक गुंतवणूक आपल्याच गृहराज्यात नेण्याचा मोदी-शहांचा अट्टहास ‘राष्ट्रीय’ बाण्यास धक्का देणारा आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ ऐवजी ‘गुजरातचा विकास आणि सारा देश भकास’ अशी नवी घोषणा द्यावी, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत.महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड किंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या किडनॅपिंग’वर राज्याचे मिचे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी श्री. मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जगातले कोणतेही पाहुणे आले की, त्यांना दिल्लीच्या आधी गुजरातेत नेऊन झोपाळ्यावर झुलवायचे. म्हणजे गुजरात हाच देश, बाकी सर्व कचरा! हे धोरण गुजरातलाही अधोगतीकडे नेणारे व एकमेकांत दरी निर्माण करणारे आहे. मुंबईचे महत्त्व त्यांना कमी करायचेच आहे, पण आता त्यांची वाकडी नजर महाराष्ट्राकडे गेली आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. गुजरातचा विकास आणि सारा देश भकास अशी नवी घोषणा आता द्यावी लागेल. रुपयातील ८० पैसे गुजरातला व २० पैशात सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही?, असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या टीकेला शिंदे-फडणवीस सरकारकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र धडधडीत खोटे बोलत आहेत हे सगळे स्वत:चे अपशय झाकण्याचे ‘उद्योग’ आहेत. महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत आणि मिडणवीस सरकार भरसभेत द्रौपदी वस्त्रहरण सुरू असताना समेतील प्रमुख लोक जसे माना खाली घालून बसले होते तसे वसले आहे. रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उद्योग आणि रोजगाराच्या संधींचे अपहरण गुजरातकडून केले जात आहे. हे अपहरण उघडया डोळयाने पाहणारे मुख्यमंत्री त्याच्या मिथे गटासह रामदर्शनासाठी म्हण अयोध्या नगरीत निघाले आहेत, हा विनोदच म्हणावा लागेल.

महाराष्ट्राच्या हातचे जे उद्योग जात आहेत तो गुंता सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र त्याऐवजी लवकरच मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत, असे याचे आकडे लावले जात आहेत. हे आधी बंद करा आणि लाख रोजगार पळवून नेणारा मोदी-शहांना खडसावून जाब विचारण्याची हिंमत दाखवा. आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झोप जात नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अशा घोर काळी पटते. एका विशाल दृष्टिकोनातून या नेत्यांनी विचार केला म्हणून हे राष्ट्र घडले व टिकले, याकडे सामनातून लक्ष वेधण्यात आले आहे.