तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक , खरे काय …

0
296

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : ‘मातोश्री’विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सध्या तुरुंगात आहेत. नवनीत राणा या दलित असल्यानं तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले होते. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला होता. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करीत सत्य समोर आणलं आहे.

मागास वर्गातील असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या आरोपांवर सचिन सावंत यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवनीत राणा यांचा मुंबई पोलीसांनी त्या दलित समाजाच्या (?) असल्याने अन्नपाण्यावाचून ठेवले हा आरोपही असत्य आहे. दुर्दैवाने फडणवीस साहेबांनी त्याला दुजोरा दिला. तेथील वरिष्ठ अधिकारी व काही अधिकारी दलित समाजाचे आहेत. त्यांच्या वकिलाचा रोजा सोडण्यासाठीही मुंबई पोलिसांनी व्यवस्था केली